ऑकलंड - श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने शुक्रवारी पाच सामन्याच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. विश्वचषकाच्या तयारीसाठी हा विजय उत्साहवर्धक ठरला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून पूर्ण केले.लोकेश राहुलने ५६, तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा कुटल्या. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघातील ५ खेळाडूंनी अर्धशतक झळकावले.भल्यामोठे आव्हान घेऊन उतरलेल्या भारताला दुसऱ्याच षटकात रोहित शर्माच्या (७) रुपाने मोठा धक्का बसला. यानंतर राहुल-कोहली यांनी दुसºया गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांनी आपली खेळी सजवली. कोहलीने ३२ चेंडूंत ३ चौकार व एक षटकार ठोकला. दोघांनी रचलेल्या पायावर विजयी कळस चढवला तो श्रेयस अय्यरने. त्याने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढताना २९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा फटकावल्या. मनिष पांड्येने (१४*) त्याला चांगली साथ दिली.तत्पूर्वी कॉलिन मुन्रो व कर्णधार केन विलियम्सन यांच्या आक्रमक अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने ईडन पार्कच्या लहान सीमारेषेचा भरपूर लाभ घेत ५ बाद २०३ धावा उभारल्या. मात्र भारताने नियोजनबद्ध फटकेबाजी करत एक षटक शिल्लक राखून विजय मिळवला. मुन्रोने ४२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा, तर विलियम्सनने २६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. अनुभवी रॉस टेलरने २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५४ धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. त्याआधी हुकमी सलामीवीर मार्टिन गुप्टीलने चौफेर फटकेबाजी करताना १९ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३० धावा फटकावत यजमानांना वेगवान सुरुवात करुन दिली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद २०३ धावा (कॉलिन मुन्रो ५९, रॉस टेलर नाबाद ५४, केन विलियम्सन ५२; रवींद्र जडेजा १/१८, शिवम दुबे १/२४, जसप्रीत बुमराह १/३१, युझवेंद्र चहल १/३२,शार्दुल ठाकूर १/४४.) पराभूतवि. भारत : १९ षटकांत ४ बाद २०४ धावा (श्रेयस अय्यर नाबाद ५८, लोकेश राहुल ५६, विराट कोहली ४५; ईश सोढी २/३६, ब्रिक टिक्नर १/३४, मिचेल सँटनर १/५०.)पहिल्यांदाच एकाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच फलंदाजांकडून अर्धशतकी खेळी.टी२०मध्ये भारताने सर्वाधिक चौथ्यांदा दोनशेहून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यानंतर आॅस्टेÑलियाने दोनवेळा अशी कामगिरी केली आहे.भारताने टी२०मध्ये तिसºया क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचे लक्ष्य पूर्ण केले. याआधी २०१९ साली विंडीजविरुद्ध २०८ आणि २००९ साली मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध २०७ धावांचे लक्ष्य भारताने पार केले होते.टी२०मध्ये ईश सोढीने भारताविरुद्ध सर्वाधिक १३ बळी घेताना पाकिस्तानच्या उमर गुलला (११) मागे टाकले.यष्टीरक्षणामुळे फलंदाजीसाठी फायदा झाला - राहुल