नवी दिल्ली, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी पावसामुळे बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रद्द झाला आणि त्याचबरोबर विराट कोहलीच्या प्ले ऑफमध्ये खेळणाच्या अखेरच्या आशाही विरून गेल्या. आयपीएलमधील या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हाच कोहली वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजय मिळवून देईल का, असाही सवाल केला जात आहे. पण, आयपीएलमधील कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
इंग्लंड आणि वेल्स येते 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. 12 मे ला आयपीएलची अंतिम लढत होईल आणि त्यानंतर भारतीय संघालीत खेळाडूंना विश्रांतीसाठी 21 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका