SL vs BAN Najmul Hossain Shanto steps down as Bangladesh Test captain : कोलंबोच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशच्या संघाला काही क्षणातच आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर नजमुल हुसेन शांतो याने कर्णधारपद सोडले आहे. त्याने घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडणारा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन्सीत रचला होता नवा इतिहास
गाले कसोटी सामन्यात शांतोनं पहिल्या डावात १४८ आणि दुसऱ्या डावात नाबाद १२५ धावांच्या खेळीसह इतिहास रचला होता. एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झलकवणारा तो पहिला बांगलादेशी कॅप्टन आहे. संघाचे नेतृत्व करताना फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून देताना खास पराक्रम केल्यावर तो कॅप्टन्सी सोडेल, असा विचारही कुणी केला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यातील पराभव अन् मालिका गमावल्याची गोष्ट त्याच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते.
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीसमोर फिकी ठरली फ्लिंटॉफच्या लेकाची फिफ्टी! युवा टीम इंडियाची विजयी सलामी
मॅचसह मालिका गमावल्यावर घेतला कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. पण दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेनं संघाने बांगलादेशला एक डाव आणि ७८ धावांनी पराभूत केले. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं २ सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी आपल्या नावे केली. पहिल्या सामन्यात फलंदाजीत धमक दाखवणाऱ्या शांतोला दुसऱ्या डावात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सामन्यानंतर काही वेळातच त्याने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले. हा बांगलादेशच्या संघाला एक मोठा धक्काच आहे.
फिरकीपटूनं घेतली बांगलादेशच्या फलंदाजांनी गिरकी
दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं तर बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पथुम निसंका याचे शानदार शतक आणि चंडीमल आणि कुसल मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४५८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंखेचा पाठलाग करताना श्रीलंकन फिरकीपटू प्रभात जयसूर्यानं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. त्याने अर्धा संघ तंबूत धाडला. परिणामी बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात १३३ धावांत ऑल आउट झाला.