मुंबई - टी-20 मालिका आटोपल्यावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले आहे. आता धवनच्या अनुपस्थितीत युवा सलामीवीर मयांक अग्रवाल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन संघाबाहेर
विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन संघाबाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:31 IST