पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...

संघातून वगळल्यावर पृथ्वी शॉनं घेतलाय मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:25 IST2025-06-23T16:19:12+5:302025-06-23T16:25:46+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw Wants NOC From Mumbai Cricket Association Got Offer Rrom Three Four Teams With Maharashtra | पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...

पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पृथ्वी शॉ हा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील गोष्टींमुळे अधिक चर्चेत आहे. टीम इंडियात कमबॅकचं सोडा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट संघातही स्थान मिळवणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. कामगिरीतील सातत्याचा अभाव अन् फिटनेसच्या मुद्यावरून त्याला मुंबई संघाबाहेर बसण्याची वेळ आली. त्यानंतर पृथ्वी शॉ आता मुंबईचा संघ सोडण्याच्या तयारीत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मुंबईचा संघ सोडण्याच्या तयारीत आहे पृथ्वी, कारण...

IPL मेगा लिलावातही तो अनसोल्ड राहिला होता. पृथ्वी शॉनं मुंबईचा संघ सोडून अन्य संघाकडून खेळण्याचा विचार केला असल्याचे वृत्त चर्चेत आहे. पृथ्वी शॉनं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य ३-४ संघाकडून त्याला ऑफर असल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचेही बोलले जाते.  यात महाराष्ट्र संघाचाही समावेश असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.  

कसोटीत ९९ धावांवर विकेट्स गमावणारे फलंदाज, ब्रूकसोबत या यादीत पंत अन् MS धोनीचंही नाव

MCA अध्यक्षांनी केलीये पृष्टी, लवकरच पृथ्वीच्या NOC वर घेणार निर्णय

क्रिकबझच्या वृत्तानुसार, MCA चे अध्यक्ष अभय प्रताप यांनी पृथ्वी शॉनं NOC मागितल्याची गोष्ट सांगितली असून यासंदर्भात MCA लवकरच निर्णय घेईल, असे म्हटले आहे. याआधी MCA निवड समितीने पृथ्वीला पुन्हा मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेसवर भर द्यावा लागेल, असे म्हटले होते. यावेळी वजन कमी करण्यासाठी एक फिटनेस प्लानही तयार करण्यात आला होता. पण पृथ्वी शॉनं याकडे दुर्लक्ष केले. परिणामी डिसेंबर २०२४ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड झाली नव्हती. 

टीम इंडियाकडून केली होती दाबात एन्ट्री

पृथ्वी शॉनं २०१८ मध्ये पृथ्वी शॉनं टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो टीम इंडियातून आउट झाला. पृथ्वी शॉनं टीम इंडियाकडून ५ कसोटी, ६ वनडे आणि १ टी -१० सामना खेळला आहे. २०२२ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धे त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता. 
 

Web Title: Prithvi Shaw Wants NOC From Mumbai Cricket Association Got Offer Rrom Three Four Teams With Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.