मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...

मी भरकटलो! सरावाला वेळ देण्याऐवजी नको त्या गोष्टीला महत्त्व दिले. नेमकं काय म्हणाला पृथ्वी शॉ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:16 IST2025-06-26T11:59:00+5:302025-06-26T12:16:04+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw Finally Breaks Silence Over His Cricket Careers Downfall Indian Cricketer Says My Own Decisions Ruined Me Not My Friends | मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...

मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Prithvi Shaw Finally Breaks Silence Over His Cricket Careers Downfall : पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावंत क्रिकेटर आहे. कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळीसह त्याने आपल्यातील धमक दाखवूनही दिली. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो टीम इंडियातील स्थान गमावून बसला. एवढेच काय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघातूनही त्याला डच्चू मिळाला. अल्पावधित मिळालेले मोठं यश आणि प्रसिद्धी बऱ्याचदा दिशा भरकटणारे ठरते. पृथ्वीच्या बाबतीतही हेच घडलं. क्रिकेटवर फोकस करण्याऐवजी फिल्डबाहेरील गोष्टीत अधिक सक्रीयतेमुळे क्रिकेटरनं स्वत:चं नुकसान करून घेतलंय, अशी चर्चा तो संघाबाहेर पडल्यापासून रंगत होती. आता खुद्द पृथ्वी शॉनंही ही गोष्ट  खरी असल्याचा दुजोरा दिलाय.  चूक कळली, आता ती मान्य करून तो पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅकसाठी कंबर कसायला तयारीत असल्याचे दिसते. इथं जाणून घेऊयात पृथ्वी नेमंक काय म्हणाला त्यासंदर्भातील माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मी भरकटलो! सरावाला वेळ देण्याऐवजी नको त्या गोष्टीला महत्त्व दिले
  
२५ वर्षीय पृथ्वी शॉनं एका मुलाखतीमध्ये अपयशाच्या गर्तेत सापडण्यामागची गोष्ट शेअर केली आहे. २०२३ पर्यंत सगळं काही ठीक होते. मी क्रिकेटवर अधिक लक्षकेंद्रीत करायचो. दिवसातील ८ तास सराव व्हायचा. पण त्यानंतर मी काही चुकीचे निर्णय घेतले. ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या त्याला महत्त्व दिले. परिणामी मैदानातील सराव कमी झाला. फक्त ४ तास सराव करू लागलो. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना नव्या मित्रांच्या संगत लाभली. त्यात इकडं जा...तिकडं जा या गोष्टींमुळे भरकटत गेलो.  मी काय करतोय ते मला समजायला हवं होतं.  कामगिरीचा आलेख खालवण्यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो, अशा आशयाच्या शब्दांत त्याने क्रिकेटपेक्षा इतर गोष्टीत रमल्यानं क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम झाल्याचे मान्य केले.

Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?

...अन् आयुष्यात आलेले मित्र गायब झाले

माझ्या कारकिर्दीला उतरती कळा लागली तसे आयुष्यात आलेले मित्र गायब झाले. ज्यांच्यामुळं मी भरकटत गेलो ते आता माझ्या आयुष्यात नाहीत. ही गोष्ट माझ्यासाठी सकारात्मक आहे. मी मानसिकरित्या कणखर आहे. जे घडलं त्यात माझी चूक होती. मी कुणाला दोष देणार नाही. यश माझ्या जोरावर मिळवलं अन् माझ्या चुकांमुळे मला अपयशाच्या मार्गावर नेलं, असे म्हणत पृथ्वी शॉनं पुन्हा एकदा जोमानं क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी धमाक्यात पदार्पण, पण...

पृथ्वी शॉनं २०१८ मध्ये भारतीय संघाला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकून दिला होता. याच वर्षी त्याला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधीही मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पणाच्या कसोटीत त्याने शतक ठोकले होते. पण २०२० पासून तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. जुलै २०२१ मध्ये तो टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने ५ कसोटी सामन्यासह ६ वनडे आणि एक टी २० सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Web Title: Prithvi Shaw Finally Breaks Silence Over His Cricket Careers Downfall Indian Cricketer Says My Own Decisions Ruined Me Not My Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.