R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?

ICC T20 World Cup 2026: भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर तीव्र शब्दांत टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:13 IST2026-01-02T18:10:57+5:302026-01-02T18:13:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Nobody Will Watch T20 World Cup: Ravichandran Ashwin Slams ICC Over Excessive Events and Quality Gap | R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?

R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?

भारताचा माजी क्रिकेटपटू  रविचंद्रन अश्विन याने आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर तीव्र शब्दांत टीका केली. आयसीसी स्पर्धांची अतिसंख्या आणि संघांमधील गुणवत्तेची वाढती दरी यामुळे प्रेक्षकांचा खेळातील रस कमी होत असल्याचा खळबळजनक दावा अश्विनने केला आहे. त्यामुळे यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही, असेही तो म्हणाला. अश्विनचे हे वक्तव्य सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना स्पष्ट केले की, स्पर्धेतील सुरुवातीचे सामने अत्यंत एकतर्फी होत आहेत. "यावेळी टी-२० विश्वचषक पाहण्यात कोणालाही रस नसेल. भारत विरुद्ध अमेरिका आणि त्यानंतर भारत विरुद्ध नामिबिया यांसारखे सामने चाहत्यांना क्रिकेटपासून दूर नेतील. पूर्वी विश्वचषक चार वर्षांतून एकदा व्हायचा, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळायचा. सुरुवातीच्या टप्प्यात भारत, इंग्लंड किंवा श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांशी भिडायचा, जे पाहणे अधिक थरारक होते", असे तो म्हणाला.

अश्विनने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावरही ताशेरे ओढले. २०१० पासून दरवर्षी जवळपास एक मोठी आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे. अश्विन म्हणाला की, २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक (कोविडमुळे लांबलेला), २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यात आली आणि आता २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे." अश्विनच्या मते, दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धांमुळे विश्वचषकाला एक खास ओळख होती, ती आता पुसली जात आहे. वारंवार होणाऱ्या या स्पर्धांमुळे प्रेक्षकांमधील रस कमी होत आहे.

येत्या ७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. २० संघांच्या या स्पर्धेत भारत गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. मात्र, भारताचा पहिलाच सामना युनायटेड स्टेट्स विरुद्ध असल्याने अश्विनने या फॉरमॅटवर शंका उपस्थित केली. वरच्या स्तरातील संघ आणि नवख्या संघांमधील गुणवत्तेत मोठी तफावत असल्याने प्रेक्षकांना स्पर्धेच्या सुरुवातीला खिळवून ठेवणे कठीण जाईल, असे त्याला वाटते.

Web Title : आर अश्विन का अनुमान, आगामी टी20 विश्व कप को कम दर्शक मिलेंगे

Web Summary : आर अश्विन ने आईसीसी की अत्यधिक टूर्नामेंटों के लिए आलोचना की। उनका दावा है कि बार-बार विश्व कप उत्साह कम करते हैं, जिससे उदासीनता आती है। मजबूत और उभरती टीमों के बीच असमान प्रतिस्पर्धा के कारण शुरुआती मैचों में रोमांच की कमी है, जिससे दर्शकों की संख्या कम हो सकती है। उन्होंने टी20 प्रारूप की अपील पर सवाल उठाया।

Web Title : R Ashwin predicts low viewership for upcoming T20 World Cup

Web Summary : R Ashwin criticizes ICC for overabundance of tournaments. He claims frequent World Cups diminish excitement, leading to disinterest. Initial matches lack thrill due to uneven competition between strong and emerging teams, potentially reducing viewership. He questions the T20 format's appeal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.