IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक

आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला. या कामगिरीसह मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम नोंदवला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 10, 2020 11:18 PM2020-11-10T23:18:39+5:302020-11-10T23:18:56+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians win IPL trophy in two countries; Rohit Sharma is a only player to win IPL Trophy in 3 different Countries | IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक

IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला. या कामगिरीसह मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम नोंदवला.

    
मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या. 

समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी'कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.   रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विजयासाठीच्या आवश्यक धावा अन्य फलंदाजांनी सहज केल्या. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईनं १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा करून जेतेपद पक्कं केलं. इशान किशन १९ चेंडूंत ३३ धावांवर नाबाज राहिला. 

दोन देशांमध्ये आयपीएल जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला. मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये भारतात आणि २०२०मध्ये UAEत जेतेपद पटकावले. रोहित शर्मानं तीन देशांमध्ये आयपीएल जेतेपद उंचावण्याचा मान पटकावला. २००९मध्ये डेक्कन चार्जर्सकडून दक्षिण आफ्रिकेत जेतेपद पटकावले होते.
 

Web Title: Mumbai Indians win IPL trophy in two countries; Rohit Sharma is a only player to win IPL Trophy in 3 different Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.