Join us

IPL : मुंबई संघ मंदगती सुरुवात करतो, पण जिंकतो : जहीर

IPL : आम्ही अंतिम ११ जणांचा संघ खेळविण्याआधी सखोल चर्चा करतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 05:35 IST

Open in App

मुंबई : ‘पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाची आयपीएल-१५ मध्ये पराभवासह सुरुवात झाली. या संघाचे संचालक जहीर खान यांनी आमचा संघ मंद सुरुवात करतो, पण दीर्घकाळ चालणारी लीग जिंकतो,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. शनिवारी राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना जहीर यांनी  संघातील माहोल उत्साहपूर्ण ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

आम्ही अंतिम ११ जणांचा संघ खेळविण्याआधी सखोल चर्चा करतो. पहिल्या सामन्यात आमची सुरुवात कशी असते याच्याशी आपण परिचित असालच. भाकीत व्यक्त करणे अतिघाईचे ठरेल. आमचा उत्साह आणि तयारी शानदार असून पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहोत, असे जहीर यांनी म्हटले आहे. बोटाच्या दुखापतीमुळे दिल्लीविरुद्ध पहिल्या सामन्यास मुकलेला सूर्यकुमार यादव राजस्थानविरुद्ध खेळेल. सूर्याने सराव केला. इशान किशन हादेखील पुढील सामन्यासाठी फिट आहे. तो या सामन्यात यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यास सज्ज असल्याची माहिती जहीर खान यांनी दिली.

टॅग्स :झहीर खानमुंबई इंडियन्सआयपीएल २०२२
Open in App