आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर-२ सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. आयपीएलच्या इतिहासात क्वालिफायर-२ मध्ये चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत, यात मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, जोस बटलर आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.
१) मुरली विजय (चेन्नई सुपर किग्ज)आयपीएल २०१२ चा क्वालिफायर-२ सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईने हा सामना ८६ धावांनी जिंकला. चेन्नईच्या विजयात मुरली विजयने महत्त्वाची भूमिका बजावली. मुरली विजयने अवघ्या ५८ चेंडूत ११३ धावा केल्या, ज्यात १५ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याच्या व्यतिरिक्त ड्वेन ब्राव्होने ३३ धावा आणि सुरेश रैनाने २७ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत २२६ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
वीरेंद्र सेहवाग (किंग्ज इलेव्हन पंजाब)आयपीएल २०१४ चा क्वालिफायर-२ सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला, ज्यात पंजाबचा विजय झाला. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने पंजाबसाठी जोरदार फलंदाजी केली आणि ५८ चेंडूत १२२ धावा केल्या. यात १२ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. आयपीएल क्वालिफायर-२ मध्ये शतक करणारा तो पंजाबचा एकमेव फलंदाज आहे.
जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)आयपीएल २०२२ चा क्वालिफायर-२ सामना आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला, ज्यात राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने ६० चेंडूत १०६ धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ६ षटकार निघाले. जोस बटलरच्या शतकी खेळीमुळे राजस्थान हा सामना जिंकू शकला.
शुभमन गिल (गुजरात टायटन्स)आयपीएल २०२३ चा क्वालिफायर-२ सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये गुजरातने ६२ धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलने सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने ६० चेंडूत १२९ धावा केल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.