IPL 2025 PBKS vs RCB Rajat Patidar On Virat Kohli : आयपीएलच्या १८ व्या हंगामात थेट फायनल गाठणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) चा संघ पंजाब किंग्ज विरुद्ध जेतेपदासाठी भिडणार आहे. पहिल्या क्लालिफायर लढतीची पुनरावृत्तीसह अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामना जिंकून पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. या मेगा फायनलआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार याने मोठं वक्तव्य केले आहे. यंदाच्या हंगामातील ट्रॉफी विराट कोहलीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. या दिग्गजासाठी आम्हाला यंदा ट्रॉफीवर नाव कोरायचंय अशा आशयाचे वक्तव्य त्याने केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला RCB कॅप्टन?
अंतिम सामन्याआधी आरसीबीच्या कर्णधाराने पत्रकार परिषदेत आपल्या संघाचे इरादे काय आहेत ते स्पष्ट केले. तो म्हणाला की, विराट कोहली मागील १८ वर्षांपासून RCB संघासह टीम इंडियासाठी बहूमूल्य योगदान देत आहे. त्याच्यासाठी ट्रॉफी जिंकायची आहे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आतापर्यंत २००९, २०११ आणि २०१६ च्या हंगामात फायनल खेळलीये. या तिन्ही फायनल वेळी विराट RCB संघाचा भाग होताच. शेवटची फायनल खेळली त्यावेळी तर तोच संघाचा कर्णधारही होता. पण अद्याप संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
कोहली 'फॅक्टर'संदर्भातील प्रश्नावर असं दिल उत्तर
RCB कॅप्टनला यावेळी 'विराट फॅक्टर' दिसेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने नक्कीच त्याचा प्रभाव दिसेल असा रिप्लाय दिला. फक्त एका खेळाडूवर लक्षकेंद्रीत असणं संघासाठी घातक नाही का? या प्रश्नासह त्याला एक बाउन्सरही आला. यावर तो म्हणाला की, ते निराशजनक आहे असं अजिबात वाटत नाही. विराट कोहलीनं फ्रँचायझी संघासह भारतीय क्रिकेटसाठी अनेक वर्षे योगदान दिले आहे.आम्ही फायनलमध्ये सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही सर्व मिळून चांगली कामगिरी करण्यावर लक्षकेंद्रीत करत आहोत.कोहलीचा प्रभाव हा संघासाठी जमेची बाजू आहे, असेही तो म्हणाला आहे.