Join us  

IPL 2020 Final : मार्कस स्टॉयनिस पहिल्याच चेंडूवर माघारी गेला अन् गौतम गंभीर ट्रोल झाला, जाणून घ्या कारण!

एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणाराही तो पहिलाच संघ ठरला. 

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 8:15 AM

Open in App

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पण, हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर गौतम गंभीर ट्रेंड सुरू होता. त्यामागे एक मजेशीर कारण आहे.

मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिस बाद झाला आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याल नेटिझन्सनं ट्रोल केलं. गौतमनं त्याच्या फॅन्टसी XI संघाचा कर्णधार स्टॉयनिसला केलं होतं.     क्विंटन डी'कॉक आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईनं १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा करून जेतेपद पक्कं केलं. इशान किशन १९ चेंडूंत ३३ धावांवर नाबाद राहिला.   

टॅग्स :IPL 2020गौतम गंभीरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स