श्रीलंकेवर विजय मिळवून भारताकडे आघाडी

डी वेंकटेश्वर याने ५० धावा करून भारतीय धावसंख्येला आकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:06 PM2018-10-15T21:06:40+5:302018-10-15T21:07:25+5:30

whatsapp join usJoin us
India's lead by winning against Sri Lanka | श्रीलंकेवर विजय मिळवून भारताकडे आघाडी

श्रीलंकेवर विजय मिळवून भारताकडे आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे: दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 मालिकेमधील पहिल्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला ३९ धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने २० षटकांमध्ये ६ गडी गमावून १९० धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. डी वेंकटेश्वर याने ५० धावा करून भारतीय धावसंख्येला आकार दिला.

 जिंकण्यासाठी १९१ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रीलंकेच्या संघाला ठराविक कालांतराने बाद होत असलेल्या फलंदाजांमुळे सावरता आले नाही आणि त्यांचा खेळ २० षटकांमध्ये ९ गडी गमावून १५१ धावांवर संपला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. अजित सिल्वाने श्रीलंकेच्या संघाकडून सर्वाधिक ५७ धाव केल्या.

Web Title: India's lead by winning against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.