टीम इंडियानं नववर्षाची विजयानं सुरुवात केली. भारत विरुद्ध श्रीलंका ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं इंदूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्स व 15 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी दमदार खेळ केला. वियजासाठीचे 143 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 17.3 षटकांत सहज पार केले. या सामन्यातून भारतानं नववर्षाची विजयानं सुरुवात केली, परंतु कर्णधार विराट कोहलीनंही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या सामन्यातील विराटची पहिली धाव ही विश्वविक्रमी ठरली.
विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेनं 9 बाद 142 धावा केल्या. या सामन्यातून कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे स्टार ठरले. शार्दूलनं 23 धावांत 3, तर सैनीनं 18 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सैनीनं 147.5च्या गतीनं यॉर्कर टाकून दनुष्का गुणथिलकाचा ( 20) त्रिफळा उडवला. लंकेकडून अविष्का फर्नांडो ( 22) आणि कुसल परेरा ( 34) यांनी साजेसा खेळ केला. कुलदीप यादवनेही दोन विकेट घेतल्या.