India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. गेल्या आठवडाभरात पावसामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील चार सामने रद्द झाले आणि त्यात भारत-न्यूझीलंड सामन्याचाही समावेश होता. त्यात मँचेस्टर येथील हवामानाचा अंदाज घेतल्यास भारत-पाक सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे रविवारची जय्यत तयारी करून ठेवलेल्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नॉटिंगहॅम येथून मँचेस्टर येथे शनिवारी दाखल झाला.
( भारत-पाक लढतीत पाऊस पडल्यास १०० कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे? )
बीसीसीआयची पाकिस्तानसमोर गुगली; आठवण करून दिली 'ही' गोष्ट!भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) या लढतीवरून पाकिस्तान संघाला डिवचण्याची संधी दवडली नाही. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला पराभवाची आठवण करून दिली आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी बीसीसीआयनं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बीसीसीआयनं या सामन्याचा व्हिडीओ शेअर करून पाकिस्तान समोर गुगली टाकली आहे.