Join us  

India Vs Pakistan T20 World Cup Match : भारत-पाक क्रिकेटयुद्ध आज रंगणार! दोन वर्षांनी आमने-सामने, चाहत्यांची उत्कंठा शिगेला

India Vs Pakistan T20 World Cup Match : भारताने पाकविरुद्ध आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले असून यापैकी सहा सामने जिंकले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:16 AM

Open in App

दुबई : टी-२० विश्वचषकानिमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यात आज रविवारी ‘हायव्होल्टेज’ लढत अनुभवायला मिळणार आहे. उभय संघ २०१९ नंतर दोन वर्षांनी परस्परांविरुद्ध खेळणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारताने पाकविरुद्ध आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले असून यापैकी सहा सामने जिंकले आहेत. वन डे वर्ल्डकपमध्ये २०१९ साली इंग्लंडच्या मॅन्चेस्टर मैदानावर भारताने पाकवर मात  केली होती.

भारत पाकवर वरचढ  आतापर्यंत झालेल्या टी-२० लढतींचा विचार केला, तरी भारताचेच वर्चस्व असल्याचे दिसून येईल.  एक सामना टाय झाला. पाकने एकमेव विजय मिळवलेला आहे. कोलकाता येथे २०१६ साली विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात अखेरचा सामना झाला होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App