भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. या सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटवरून नागपूरसाठी रवाना झाला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात दोन षटकार अन् रोहितच्या नावावर अविश्वसनीय विक्रम नोंदवला जाईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दोन षटकार अन् रोहित शर्मा इतिहास घडवणार; एकाही भारतीयाला जमला नाही असा चमत्कार
दोन षटकार अन् रोहित शर्मा इतिहास घडवणार; एकाही भारतीयाला जमला नाही असा चमत्कार
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 11:00 IST