Join us  

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशच्या खेळाडूंचे जिभेचे चोचले; हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची धावाधाव

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 3:32 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे. मोहम्मद शमी, आर अश्विन यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशनं सपशेल शरणागती पत्करली. बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. पण, या सामन्यासाठी बांगलादेशनं केलेली तयारी पाहून तुम्ही त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. बांगलादेशनं या सामन्यापूर्वी कसून तयारी केली आणि त्यांची ही तयारी पाहून ते टीम इंडियासमोर कडवं आव्हान उभं करतील असे वाटले होते. पण, घडले उलटे आणि त्यांच्या तयारीवर जोक्स फिरू लागले.

अशी कोणती तयारी केली होती...ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ इंदूर येथे दाखल झाला. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशनं इतिहास घडवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कडवी टक्कर दिली. त्यामुळे कसोटीतही त्यांच्याकडून तशीच अपेक्षा होती. पण, घडलं उलटच... या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ 11 नोव्हेंबरला इंदूर येथे दाखल झाला. संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे त्यांची एका दिवसात चक्क 100 अंडी खाल्ले. येथे येण्याच्या महिनाभर आधीच बांगलादेशनं त्यांच्या जीभेचे चोचल्यांची यादी पाठवली होती. त्यात त्यांनी 100 अंडी व तीन प्रकारचे मासे अशी मागणी केली होती. 

तीन प्रकारच्या मास्यांत एलिसा, पॉपलेट आणि झींगा यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी बांगलादेश संघानं लंचमध्ये मासे व भात ही ऑर्डर दिली. त्यानंतर डिनरमध्ये ग्रेवीसह मटन आणि कोंबड्या अशी दावत त्यांनी केली.   

टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचा भेदक मारा; बांगलादेशची शरणागतीबांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या. 

 बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला.  ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.

 घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार होती. मोमिनूलची विकेट घेत त्यानं तो पल्ला गाठला. घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत. त्यानंतर शमीनं बांगलादेशचा डाव गुंडाळला. बांगलादेशकडून मोमिनूल हक ( 37) आणि मुश्फिकर रहीम (43) यांनी संघर्ष केला.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशअन्नबांगलादेशभारतीय क्रिकेट संघ