Join us

IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग

तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज या जोडीनं ८ व्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचत भारतीय 'अ' संघाच्या धावफलकावर ७ बाद ४१७ धावां लावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 21:33 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात  भारत 'अ' संघातील तळाच्या फलंदाजीतील ताकद पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात लोकेश राहुल ५१ (६४) आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन ८० (९२) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर तळाच्या फलंदाजीत तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज यांनी आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तनुष कोटियन आणि अंशुल कंबोजची जबरदस्त भागीदारी

तळाच्या फलंदाजीत तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज या जोडीनं ८ व्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचत भारतीय 'अ' संघाच्या धावफलकावर ७ बाद ४१७ धावां लावल्या. चहापानाच्या वेळी खेळा थांबला त्यावेळी तनुष कोटियन १०८ चेंडूत ९० धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला अंशुल कंबोज याने ८६ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या होत्या.

कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

मुंबईकर शतकाच्या उंबरठ्यावर असताना कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन याने डाव केला घोषित

इंग्लंड दौऱ्यातील भारत 'अ' संघाच्या अखेरच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात तनुष कोटियन शतकाच्या उंबरठ्यावर असताना अभिमन्यू ईश्वरन याने डाव घोषित केला. त्यामुळे मुंबईकराची सेंच्युरीची संधी हुकली. भारत 'अ' संघाने इंग्लंड लॉयन्स संघासमोर ३३९ धावांचे टार्गेट दिले आहे. जवळपास ३९ षटकांचा खेळ बाकी असताना कर्णधाराने मॅचचा निकाल लावण्याच्या इराद्याने खेळलेला डाव मुंबईकर तनुष कोटियन यांच्या शतकी खेळी आड आला.  तनुष कोटियन याने रणजी स्पर्धेत आपल्या मुंबईकडून खेळताना आपल्यातील अष्टपैलू खेळाची धमक दाखवली आहे. आर. अश्विनचा तो परफेक्ट रिप्लेसमेंट ठरेल, अशी चर्चाही रंगताना दिसते.  

केएल राहुलनंही दाखवली धमक

 या सामन्यात पहिल्या डावात लोकेश राहु  ११६ (१६८) च्या शतकी खेळीनंतर ध्रुव जुरेल याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय 'अ' संघाने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या होत्या. इंग्लंड लायन्सच्या संघाला पहिला डावात ३२७ धावांत रोखत भारतीय संघाने अल्प आघाडी घेतली. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल पुन्हा अपयशी ठरला. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुलनं ९ चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. त्याने ६४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या अभिमन्यू ईश्वरन याने ९२ चेंडूत ८० धावांची खेळी केली.  याशिवाय नितीश कुमार रेड्डी ४२(७८) आणि शार्दुल ठाकूर यांनी ३४ (४७) ही उत्तम बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ