श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संघ अडचणीत सापडला असताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटमधून जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. टी-२० कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावत तिने संघाचा डाव सावरला. फिक्या ठरल्या त्यावेळी तिने ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५८.१४ च्या सरासरीसह ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकात अरुंधतीचा धमाका
अखेरच्या षटकात अरुंधती रेड्डीनं आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवताना ११ चेंडूत २२४.४५ च्या सरासरीसह नाबाद २७ धावांची खेळी करत निर्धारित २० षटकात भारताच्या धावफलकावर १७५ धावा लावल्या. या दोघींशीवाय अमनजोत कौर २१ (१८), जी कमलिनी १२(१२) आणि हरलीन देओल १३(११) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण त्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या.
Web Summary : Harmanpreet Kaur's fifty and Arundhati Reddy's explosive knock powered India to 175 against Sri Lanka in the final T20. Harmanpreet scored 68, while Arundhati smashed 27 off 11 balls.
Web Summary : हरमनप्रीत कौर के अर्धशतक और अरुंधति रेड्डी की आक्रामक पारी की बदौलत भारत ने श्रीलंका के खिलाफ आखिरी टी20 में 175 रन बनाए। हरमनप्रीत ने 68 रन बनाए, जबकि अरुंधति ने 11 गेंदों में 27 रन बनाए।