Sunil gavaskar on Match turning point, IND vs ENG 5th Test: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध खेळलेला पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने ६ धावांनी जिंकला. या विजयासह पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. पहिल्या डावात भारताने २२४ तर इंग्लंडने २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे इंग्लंडचा विजय दृष्टीपथात होता. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५ धावांची आवश्यकता होती. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमत्कार केला आणि शेवटचा सामना जिंकून इतिहास रचला. टीम इंडियाच्या विजयावर भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मत मांडले. सामन्याचे विश्लेषण करताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
सुनील गावस्कर म्हणाले, "टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केली. जो रूट आणि जेमी स्मिथ बाद झाल्यावर सामना पालटला. या दोन विकेट पडल्यानंतर सामना भारताच्या बाजूने आला. त्यांनी सांगितले की सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी फक्त ३५ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे, अशी भीती होती की जर जेमी स्मिथ खेळत राहिला तर टीम इंडियाला जिंकणे कठीण होईल. पण, मोहम्मद सिराजने चमत्कार केला. त्याने जेमी स्मिथला फक्त दोन धावांवर बाद केले आणि तिथूनच खेळ बदलला. कारण शेवटच्या क्षणी स्मिथ गेमचेंजर ठरू शकला असता."
गिलची तोंडभरून स्तुती
"हा टीम इंडियासाठी ऐतिहासिक विजय आहे. मला ते आवडणार नाही. कारण प्रत्येक युगात वेगवेगळी आव्हाने असतात, परिस्थिती वेगळी असते. खेळपट्ट्या वेगळ्या असतात, खेळण्याच्या परिस्थिती वेगळ्या असतात. त्याची तुलना इतर मालिकांशी करता येणार नाही. शुभमन गिलने खूप हुशारीने कर्णधारपद भूषवले. त्याने खेळाडूंना योग्य दिशा दाखवली, तसेच त्याची जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली," अशा शब्दांत त्यांनी गिलची स्तुती केली.
Web Title: IND vs ENG 5th Test Sunil Gavaskar tells Jamie Smith wicket was turning point praising gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.