मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे गोलंदाजांना कमी, तर फलंदाजांनाच जास्त फायदा मिळणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या वन डे मालिकेत त्याची प्रचिती येत आहेच. 300+, 350+ अशा धावा होत आहेत आणि त्यांचा यशस्वी पाठलागही केला जात आहे. त्यामुळे सर्वच संघ तगडे फलंदाज घेऊन मैदानावर उतरतील. त्याला भारतीय संघ अपवाद नक्कीच नसेल, परंतु इतरांपेक्षा भारतीय संघ एक पाऊल पुढे राहणार आहे. कारण, इतर संघांच्या तुलनेत भारताकडे विकेट घेणारे गोलंदाज आहेत आणि हीच भारतीय संघाची ताकद आहे. त्यामुळेच जेतेपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत भारतीय संघ आघाडीवर आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक
टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 16:31 IST