Join us  

ICC World Cup 2019 : चला करूया टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर; हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ पाहाच!

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 1:35 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. न्यूझीलंड : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंडचा सामना करणार आहे. नॉटिंगहॅम येथील वातावरणाचा अंदाज घेता हा सामना होण्याची शक्यता फार कमीच आहे. स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ अपराजित आहेत. न्यूझीलंडने तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान घेतले आहे, तर भारत दोन विजयासह चौथ्या स्थानी आहे. आज दोन्ही संघांना समान गुणावर समाधान मानावे लागल्यास भारत दुसऱ्या स्थानी येईल. पण, तत्पूर्वी ट्रेंट ब्रिजवरील भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमची आपण सफर करूया..भारताच्या विजयपथावर पावसाचा अडथळा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज!आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांना नेटमध्ये सराव करण्याची थोडीशी संधी मिळाली, परंतु बुधवारी बराच वेळ पावसामुळे वाया गेला. गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे सामना होण्याची शक्यताही फार कमीच आहे. येथील सध्याचं तापमान हे 10 ते 12 डिग्री सेल्सियस असे आहे. या महिन्यात नॉटींगहॅम येथे 98 मिमी पावसाची नोंद झाली आणि त्यापैकी 50 मिमी पाऊस हा मंगळवारी पडला. 

पाहा संपूर्ण व्हिडीओम्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव दिवस नाही, आयसीसीनं सांगितलं कारणपावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही विचारण्यात येत आहे. आयसीसीनंही राखीव दिवस न ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले की,''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असता तर स्पर्धा लांबली असती आणि व्यावहारिक रुपात हे परवडणारे नव्हते. त्याने खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना त्याचा फटका बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'' 

बाद फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस''हा बेभरवशी पाऊस आहे. येथे जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. 2018 मध्ये येथे 2 मिमी पावसाची नोंद झाली होती, परंत आता केवळ 24 तासांत 100 मिमी पाऊस पडला आहे. बाद फेरीच्या सामन्यांसाठी आम्ही राखीव दिवस ठेवला आहे,'' अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली. 

केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणंयंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारतानं दोन सामने जिंकून टॉप फोरमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनं पावसाकडे गाऱ्हाणं गायलं आहे. त्यानं नॉटिंगहॅम येथे नाही, तर महाराष्ट्रात तुझी गरज असल्याची विनंती वरुण राजाला केली आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत