श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Cycle 2025-27) स्पर्धेच्या चौथ्या हंगामाला सुरुवात झालीये. दुसरीकडे भारतीय संघ २० जून पासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून WTC च्या नव्या चक्राची सुरुवात करेल. या दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार असल्याची गोष्ट चर्चेत आली आहे. पाच दिवस खेळवण्यात येणारा कसोटी सामना ४ दिवसांचा करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात या नव्या बदलासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC नं केलीये चार दिवसीय कसोटी सामने खेळवण्याची तयारी, पण...
सध्याच्या घडीला जी माहिती समोर येतीये त्यानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) २०२७-२९ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामात ४ दिवसीय कसोटी सामन्यांचा नियम लागू करणार आहे. आता हा बदल हा या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या संघांसाठी सरसकट नसेल. फक्त छोट्या देशातील क्रिकेट संघांसाठी चार दिवसीय कसोटी सामन्याला मंजूरी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. दुसऱ्या बाजूला भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे नियमित पाच दिवसीय कसोटी सामनाच खेळतील.
IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी
कधी पासून अपेक्षित आहे कसोटीतील नवा बदल?
‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, मागच्या आठवड्यात लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या WTC फायनलच्या दरम्यान कसोटीतील नव्या बदलासंदर्भात चर्चा करण्यात आलीये. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ च्या WTC चक्रात चार दिवसीय कसोटी सामने खेळण्याच्या मुद्याला सहमती दर्शवली आहे.
टीम इंडियासह इंग्लंड अन् ऑस्ट्रेलिया जुनी परंपरा जपणार असल्याचीही चर्चा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पाचव्या हंगामात चार दिवसीय कसोटी सामने पाहायला मिळतील. पण या दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामना हा मात्र पाच दिवसांचा राहिल, अशी चर्चा देखील झाल्याचे समजते.
याआधीच द्विपक्षीय मालिकेत झालाय चार दिवसीय कसोटीचा प्रयोग आयसीसीने याआधी २०१७ मध्ये द्विपक्षीय लढतींसाठी चार दिवसीय कसोटी सामन्याला मंजूरी दिली होती. २०१९ आणि २०२३ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात हा प्रयोग झाला. झिम्बाब्वेनंही चार दिवसीय कसोटी सामना खेळला आहे. छोट्या देशांनीही कसोटीला पसंती द्यावी यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. कमी केलेला दिवस भरून काढण्यासाठी प्रत्येक दिवशी ९० षटकांऐवजी ९८ षटकांचा खेळ अपेक्षित आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अधिकृतरित्या याची घोषणा कधी होणार ते पाहण्याजोगे असेल.