शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बर्मिंघम येथील एजबेस्टनच्या मैदानात इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल दिसू शकतात. सध्याच्या घडीला 'चायनामन' कुलदीप यादव हा प्लेइंग इलेव्हनच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसून येते. कॅप्टन शुबमन गिलसाठी तो ट्रम्प कार्ड ठरेल, अशी चर्चाही रंगताना दिसत आहे. खरंच तो टीम इंडियासाठी फायद्याचा ठरू शकतो का? कसा आहे त्याचा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील रेकॉर्ड जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बदलासह मैदानात उतरणार टीम इंडिया
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतील. यात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप किंवा अर्शदीप सिंग यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. याशिवाय कुलदीप यादव याच्यावर डाव लावणे फायद्याचा सौदा ठरेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. इथं जाणून घेऊयात कशी राहिलीय फिरकीपटूची इंग्लडं विरुद्धच्या कसोटीतील कामगिरी त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड भारी, पण...
आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत कुलदीप यादवनं इंग्लंडविरुद्ध ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.२८ च्या सरासरीसह ३८.७ च्या स्ट्राइक रेटसह २१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची त्याची ही आकडवेरी भारीच आहे. पण इंग्लंडच्या मदानात मात्र तो एकमेव कसोटी सामना खेळलाय. २०१८ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात त्याला खेळण्याची संधी मिळआली. जी पहिली आणि शेवटची ठरली. त्यावेळी त्याने ९ षटके गोलंदाजी केली होती. ज्यात एकही विकेट त्याच्या हाती लागली नाही.
खरंच तो प्लेइंग इलेव्हनसाठी भारी पर्याय ठरेल का?
फिरकीपटू ही भारतीय गोलंदाजीतील खरी ताकद आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याचा प्रयोग आमजावण्याऐवजी भारतीय संघाने रवींद्र जडेजाच्या रुपात एकमेव अष्टपैलू फिरकीपटूला संधी दिली. जडेजाने अनेकदा आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीत तो फेल ठरला. सामना रंगतदार स्थितीत पोहचल्यावर अनेकांना थेट कुलदीप यादव आठवण आली. कारण तो चेंडूसह मॅच वळवण्याची क्षमताही बाळगतो. इंग्लंडमधील त्याचा रेकॉर्ड उत्तम नसला तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली, तर ही गोष्ट टीम इंडियासाठी निश्चितच फायद्याची ठरू शकते.