Join us

ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

शुबम गिल हा टीम इंडियातील मर्यादीत खेळाडूंचं नेतृत्व करतोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:08 IST

Open in App

Nasser Hussain on Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलनं शतकी खेळीसह फलंदाजीत खास छाप सोडली. पण टीम इंडियाला सामना जिंकून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडच्या संघाने ३७१ धावांचे आव्हान सहज पार करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधाराने शुबमन गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शुबमन गिलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासारखी धमक अजिबात दिसली नाही, असे नासिर हुसेन याने म्हटले आहे. एवढेच नाही तर शुबम गिल हा टीम इंडियातील मर्यादीत खेळाडूंचं नेतृत्व करतोय  असे वाटले, असा उल्लेखही इंग्लंडच्या दिग्गजाने केलाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित-विराटसारखी धमक दिसत नाही

‘स्काय स्पोर्ट्स’वरील खास शोमध्ये नासिर हुसेन म्हणाला की,  रोहित-विराट मैदानात असायचे त्यावेळी संघाचे नेतृत्व कोण करत आहे ते तुम्हाला बघितल्यावर लगेच लक्षात यायचे. पण शुबमन गिलमध्ये ती धमक दिसली नाही.  मैदानात २-३ कॅप्टन दिसले. शुबमन गिल हा मर्यादीत  संघाचे नेतृत्व करत होता, ही गोष्टही दिसून आली, अशा शब्दांत नासिर हुसेन यांनी शुबमन गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...

वरिष्ठ खेळाडूंसमोर कॅप्टनचा रुबाब एकदम फिका

शुबमन गिल हा वरिष्ठ खेळाडूंसोबत संवाद साधताना दिसला नाही. यासाठी नासिर हुसेन यांनी रवींद्र जडेजाचा दाखला दिला. जडेजा हा एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्यासाठी खेळपट्टीही अनुकूल होती. पण त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली नाही. कॅप्टनच्या रुपात शुबमन गिलनं यासंदर्भात त्याच्यासोबत बोलणं गरजेचे होते. पण वरिष्ठ खेळाडूसोबत त्याने संवादच साधला नाही. ही गोष्ट संघातील वरिष्ठ खेळाडूंसमोर कॅप्टन हतबल असल्याचे दृश्य दाखवून देणारी होती, असेही नासिर हुसेन याने म्हटले आहे.

हार्दिक पांड्याचाही दिला दाखला

भारतीय संघाला सध्याच्या घडीला हार्दिक पांड्यासारख्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे. जो उत्तम गोलंदाजीसह धावाही करू शकतो. तळाच्या फलंदाजीत ४१ धावांवर ७ विकेट्स आणि ३० धावांत ६ विकेट्स पडत असतील तर टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धची मालिका संपल्यात जमा आहे, असेही या  इंग्लंडच्या दिग्गजाने बोलून दाखवले आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्सरोहित शर्माविराट कोहली