Join us

"मी तोंड उघडलं तर...!"; IPL 2025 फायनलवरून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

एलिमिनेटर (GT विरुद्ध MI) जिंकणारा संघ १ जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध क्वालिफायर २ खेळेल. हा सामना जिंकणारा संघ ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आरसीबीसोबत खेळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:34 IST

Open in App

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला क्वालिफायर-१ सामना जिंकून, आरसीबी संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर क्वालिफायर-२ सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ असेल. तत्पूर्वी, अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता. मात्र, तो स्थगित झाल्याने त्याचे वेळापत्रक आणि ठिकाण बदलण्यात आले. आता यावरूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर, जेव्हा नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, तेव्हा बीसीसीआयने प्लेऑफच्या वेन्यूची माहिती दिली नव्हती. तेव्हाच, अंतिम सामना कोलकात्या ऐवजी अहमदाबादमध्ये खेळला जाऊ शकतो. कारण 3 जूनच्या जवळपास कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचे नव न घेता, त्यांनी आयपीएलसह भारतीय संघाचे मोठ मोठे सामने अहमदाबाद येथे आयोजित  केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी माझ्या नावाने स्टेडियम तायार करत नाही. मी माझ्या नावाने रेल्वे लाईन तयार करत नाही. मला प्रसिद्धीची गरज नाही. आदर्श माणूस म्हणून जगणे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. आपण मोदी स्टेडियम बांधले आणि तिथेच सर्व सामने आयोजित होत आहेत. कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये सामने का होत नाहीत? सर्व सामने फक्त गुजरातमध्येच का होत आहेत? मला सर्व माहित आहे. जर मी तोंड उघडले, तर तुम्ही बाहेर कमावलेली सर्व प्रतिष्ठा जाईल."

महत्वाचे म्हणजे, अहमदाबाद येथे बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची आसन क्षमता १ लाख ३२ हजार एवढी आहे, ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम देखील आहे.

आयपीएलचा अंतिम सामना ३ जूनला -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुल्लांनपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ आयपीएलचा अंतिम सामना आणि क्वालिफायर २ ठिकाणच नाही, तर क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामन्यांची ठिकाणेही बदलण्यात आली आहेत. यापूर्वी हे दोन्ही सामने हैदराबादमध्ये होणार होते, जे नंतर मोहालीला हलवण्यात आले.

एलिमिनेटर (GT विरुद्ध MI) जिंकणारा संघ १ जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध क्वालिफायर २ खेळेल. हा सामना जिंकणारा संघ ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आरसीबीसोबत खेळेल.

टॅग्स :ममता बॅनर्जीनरेंद्र मोदीइंडियन प्रिमियर लीग २०२५