Join us

दिल्लीच्या ट्वेन्टी-20 सामन्यावर मोठे संकट, अहवालात समोर आली 'ही' गोष्ट

आता हा सामना दिल्लीवरून हलवायचा हा, याचा निर्णय बीसीसीआयला लवकरच घ्यावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:24 IST

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दिल्ली येथे होणारा सामना आता संकटात आला आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी मंगळवारी दिल्लीमध्ये सामना खेळवला जाऊ नये, असे पत्र बीसीसीआयला पाठवले होते. त्यामुळे या सामन्याबाबत संदिग्धता होती. पण आता तर दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी भारत -बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबर रोजी आयोजित टी२० सामन्याचे आयोजन करू नये, अशी विनंती करणारे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिले आहे. वेगाने वाढणारे प्रदूषण खेळाडू तसेच हजारो प्रेक्षकांसाठी धोकादायक ठरू शकते,असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

दिवाळीतील आतषबाजीमुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात वेगाने वाढ झाली. डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेचे खेळाडू येथे मास्क घालून खेळले होते. त्यातील काही खेळाडू नंतर आजारीही पडले. पर्यावरणाबाबत जागरूकता पसरविणाऱ्या संस्थेच्या ज्योती पांडे आणि रवीना राज यांनी बीसीसीआया पत्रात लिहिले,‘दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे टी२० सामना दिल्लीबाहेर आयोजित करावा, अशी आम्ही नम्र विनंती करीत आहोत.’

आता दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्सचा (AQI) अहवाद सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता फारच वाईट असल्याचे म्हटले गेले आहे. या हवेमध्ये खेळाडू 3-4 तास खेळू शकणार नाहीत. त्याचबरोबर या वातावरणाचा खेळाडूंच्या आरोग्यावर वाईट परीणाम होईल, असेही म्हटले गेले आहे. त्यामुळे आता हा सामना दिल्लीवरून हलवायचा हा, याचा निर्णय बीसीसीआयला लवकरच घ्यावा लागणार आहे.

दिल्लीतील विषयुक्त हवेत तीन- चार तास खेळणारे खेळाडू आणि त्यांचा खेळ पाहणाºया हजारो प्रेक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तब्बेतीची काळजी घेणाºया हजारो लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी सामना इतरत्र खेळविला जावा, असे दोघींनी म्हटले आहे. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सामन्यावर प्रदूषणाचा परिणाम होणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दिल्ली सरकार हवेतील प्रदूषण दूर करून शुद्ध आणि मोकळी हवा घेता यावी, यासाठी उपाययोजना करीत असल्याची त्यांनी ग्वाही दिली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशदिल्ली