रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजय परेड दरम्यान बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या दुर्घटनेनंतर RCB सह कर्नाटक क्रिकेट बोर्ड अन् पोलिस प्रशासनावर टीका होत आहे. दरम्यान गतवर्षी मरीन ड्राइव्ह येथे झालेल्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतरच्या परेडही चर्चेत आली आहे. यशस्वीरित्या पार पडलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी परेडची देखरेख करणाऱ्या मुंबई पोलिसांनी बंगळुरु घटनेनंतर सार्वजनिक कार्यक्रमासंदर्भात एक महत्त्वपूर्ण वक्तव्ये केले आहे. क्रिकेटसारख्या सार्वजनिक कार्यक्रमात तिकीटाशिवाय प्रवेशच दिला जाऊ नये, असे मुंबई पोलिसांतील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इथं जाणून घेऊयात मुंबई पोलिसांनी बंगळुरुच्या गठनेनंतर नेमकं काय म्हटलंय? आणि टीम इंडियाची मिरवणुकीवेळी त्यांनी कसे केले होते नियोजन यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वांसाठी खुला अन् मोफत प्रवेश म्हणजे दुर्देवी घटनांना आमंत्रण देण्यासारखेच
इंडियन्स एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार बंगळुरुमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या भारतीय संघाच्या खुल्या बसमधून काढण्यात आलेल्या रॅलीचा दाखला देत मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, त्यावेळी सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आम्ही चांगली तयारी केली होती. पण एकदा मोठा जमाव जमला की, कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरत नाहीत. आपल्या देशातील लोकसंख्या आणि क्रिकेट या खेळाबद्दल असणारा उत्साह पाहता सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश देणं ही चांगली कल्पना नाही. अशा कार्यक्रमासाठी तिकीट देणे गरजेचे आहे. मोफत पास दिले तरी हरकत नाही. त्यामुळे किती लोक येणार त्याचा अधिकाऱ्यांना अंदाज येईल. ज्यांना पास मिळणार नाही ते येणार नाहीत. अशा प्रकारच्या खासकरुन क्रिकेटसारख्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी खुला अन् मोफत प्रवेश म्हणजे दुर्देवी घटनांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी मुंबई पोलिसांना तयारीसाठी मिळाले होते फक्त २४ तास
अन्य एका अधिकाऱ्याच्या हवाला देत वृत्तामध्ये पुढे म्हटलंय की, भारताने २९ जून रोजी टी-२० फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले आणि पाच दिवसांनी ४ जुलै रोजी टीम इंडियाची विजयी परेड आयोजित करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या फक्त २४ तास आधी परेड आयोजित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस प्रशासनाला देण्यात आली होती. ही परेड जनतेसाठी मोफत होती. या मिरवणूकीच्या तयारीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अधिकारी आणि बीएमसी अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली होती.
मुंबई पोलिसांनी अशी केली होती तयारी
टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी रात्रभर रस्त्यांवर गर्दी जमू नये यासाठी रस्त्यात बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. पोलिसांकडून याचे व्हिडिओ करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासंदर्भात सूचनाही मुंबई पोलिसांनी दिल्या होत्या.
आधीचा अनुभव होता, पण...
२०२४ मध्ये मुंबईत झालेल्या टीम इंडियाच्या विजयी परेडआधी २०००७ आणि २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतही भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. पण मागील दोन मिरवणूकीच्या तुलनेत गतवर्षी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. ३० हजार क्षमता असलेल्या वानखेडे स्टेडियमध्ये ५० हजार लोक जमा झाले होते. जे स्टेडियम भरण्यासाठी जवळपास दोन तास लागतात ते स्टेडियम फक्त ४० मिनिटांत भरले होते.
...अन् गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उभारलेली यंत्रणा कोलमडली
टीम इंडियाची विजयी परेड ही संध्याकाळी होणार होती, पण दुपारी ३ वाजल्यापासून गर्दी सुरू झाली होती. “क्रिकेटपटू ज्या ओपन एअर बसमध्ये प्रवास करणार होते ती पाहण्यासाठी आम्हाला जास्त गर्दी होईल अशी अपेक्षा होती, पण चर्चगेट स्टेशनवरून येणारी गर्दी वानखेडे स्टेडियमवर वाढतच राहिली. ५० हजारहून अधिक लोक वानखडे स्टेडियमवर बसले होते. दुसऱ्या बाजूला मरिन ड्राइव्हर जवळपास ३ लाख लोक जमले होते. गर्दी वाढेल तशी नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेली यंत्रणा कोलमडत होती. बॅरिकेट्स काढून लोक जागा करण्यासाठी धडपडत होते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याचा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.