IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका होणार का? शाहिद आफ्रिदी म्हणतो व्हायलाच हवी! कारण...

India vs Pakistan, T20 Series : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (shahid afridi) यानं भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर भाष्य केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:46 PM2021-03-25T19:46:39+5:302021-03-25T19:52:20+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan shahid afridi speaks on india pakistan cricket series and relations | IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका होणार का? शाहिद आफ्रिदी म्हणतो व्हायलाच हवी! कारण...

IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका होणार का? शाहिद आफ्रिदी म्हणतो व्हायलाच हवी! कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan, T20 Series : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) यानं भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर भाष्य केलं आहे. क्रिकेटच्याच मदतीनं दोन्ही देशांमधील तणाव कमी करता येईल असं मत शाहिदनं व्यक्त केलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान २००८ पासून क्रिकेटचे संबंध ताणले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेरची क्रिकेटची मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्ताननं तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही देश आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया चषकामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान टी-२० मालिका खेळवण्यात येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. 

Fact Check : भारत-पाकिस्तान यांच्यात २०२१मध्ये ट्वेंटी-20 मालिका होणार; दशकानंतर एकमेकांना भिडणार

शाहिद आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार दोन्ही देशांसाठी क्रिकेट अतिशय महत्वाचं आहे. उभय देशांनी राजकारण बाजूला ठेवून क्रिकेटचे होऊ दिले तर संबंध सुधारण्यात नक्कीच मदत होईल, असं आफ्रिदी म्हणाला. "खेळ आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. २००८ साठी भारतीय संघ जेव्हा आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. तेव्हा भारतीय खेळाडूंनाही पाकिस्तानात येऊन क्रिकेट खेळणं आवडलं होतं. खेळाच्याच माध्यमातून तुम्ही संबंध सुधारू शकता. पण तुमची इच्छाच नसेल तर काहीच होऊ शकत नाही", असं आफ्रिदी म्हणाला. 

भारत-पाकिस्तान मालिकेच्या शक्यतेचं वृत्त
जर सर्वकाही नियोजनानुसार पार पडले, तर भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका होईल. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला ( PCB) तसे संकेत उच्चस्तरातून मिळाले आहेत. पाकिस्तानातील वृत्तपत्र Daily Jangनं या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी PCB सूत्राचा हवाला देताना नाव गुपित ठेवलं आहे. ''आम्हाला तयार राहण्यास सांगितले आहे,''असे त्या अधिकाऱ्यानं त्या ऊर्दू वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. 

अशी असेल मालिका
सहा दिवसांच्या या मालिकेत तीन ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. ही मालिका या वर्षाच्या मध्यंतरानंतर खेळवण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी PCBचे चेअरमन एहसान मणी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधावर भाष्य केले होते आणि २०२३मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानात येईल, अशी आशा व्यक्त केली होती.

फॅक्ट चेक
भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेसंदर्भात BCCIकडून अजून कोणताही अधिकृत दुजोरा आलेला नाही. गेल्या काही वर्षांत उभय देशांतील संबंध आणखी बिघडले आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत क्रिकेट मालिका होईल, याची शक्यता नाहीच आहे.
 

Web Title: india vs pakistan shahid afridi speaks on india pakistan cricket series and relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.