उद्धव ठाकरेंनी मंत्रालय अन् वर्षा बंगल्यावर केले ध्वजारोहण; डॉक्टर्स, नर्स, पोलिसांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:24 PM2020-08-15T13:24:38+5:302020-08-15T13:53:02+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे.

खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल असं म्हणत 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा नारा दिला. यासोबतच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

तसेच 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा नारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

डॉक्टर्स, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केले.