एकूणच आकाशदीपची कहाणी ही केवळ क्रिकेटच्या मैदानापुरती मर्यादित नाही आहे. तर ही अशा एका तरुणाची कहाणी आहे ज्याने जीवनातील आव्हानांसमोर कधीही हार मानलेली नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चणचण, वैयक्तिक दु:खं सारंकाही असतानाही त्याने आपल्या मनात बाळगलेल्या स्वप्नांचा भंग होऊ दिला नाही. हाच संघर्ष त्याला आता भारतीय संघापर्यंत घेऊन आला आहे.