मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:05 PM2019-10-13T23:05:24+5:302019-10-14T00:31:12+5:30

बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे.

The math of victory over the division | मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

Next
ठळक मुद्देआजी-माजी आमदारांत लढत : शेती, सिंचनाच्या समस्येभोवती फिरतोय प्रचार

नितीन बोरसे
बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल अकरा उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होती. अखेरच्या चरणात मात्र भाजप व राष्ट्रवादीत चुरशीचा सामना झाला. त्यावेळी मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला; मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांचा चांगलाच कस लागणार आहे. बागलाण हा शेतकरी, आदिवासी, मजूर, मध्यमवर्गीय मतदारांचा मतदारसंघ आहे. या भागातील मतदार शेतीव्यवसायाशी निगडित असल्यामुळे साहजिकच शेती आणि पाणी समस्या हे कळीचे मुद्दे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक कोणतीही असो या प्रश्नांभोवतीच फिरत असते.
तालुक्यातील हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे-भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना तत्कालीन युती शासनाच्या काळात मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षे ही कामे रखडली. दरम्यानच्या काळात युतीची सत्ता आली. या भागाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला; मात्र श्रेयवादाच्या लढाईत या कामांना खीळ घालण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप केले जातात. राजकारणात पूर्णपणे सक्रिय झालेले माजी आमदार दिलीप बोरसे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळून युतीला ७२ हजारांचे मताधिक्य मिळवून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्टÑवादीच्या उमेदवार दीपिका चव्हाण आपल्या कामांचा हिशेब मतदारांसमोर मांडत आहेत. पण, अखेरच्या चरणात बोरसेंना रोखण्यासाठी चव्हाण कोणते अस्त्र वापरतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. यंदा मात्र बागलाणमधील लढत चुरशीची होणार हे निश्चित.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
शहराबाहेरून जाणारा बाह्य वळण रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित.
४सटाणा शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेचे राजकारण.
४रखडलेला खमताणे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न.
४मोसम, आरम, हत्ती व कान्हेरी नदीवर केटीवेअर बंधारे.
बोरसे पराभवाचा वचपा काढणार का ?
गेल्या निवडणुकीत भाजपने अचानक माजी आमदार दिलीप बोरसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली; मात्र त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बोरसे गेल्या पाच वर्षांपासून मेहनत घेत आहेत. यंदा महायुती झाल्याने मतांची विभागणी टळण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांतील कामांखेरीज विद्यमान आमदार नाराजांची मनधरणी कशी करतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
बदललेली समीकरणे
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये बागलाण स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. यापूर्वी बागलाणची ३८ गावे कळवण मतदारसंघात होती, तर देवळा तालुक्यातील १२ गावे बागलाण मतदारसंघात होती. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.
भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोसम, आरम, करंजाडी, काटवण आणि पश्चिम आदिवासी पट्टा या पाच भागात विभागला गेला आहे. बागलाणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोसम खोऱ्याला जास्त मिळाली आहे.
बागलाणचे पहिले आमदार सजन राघो पाटील यांच्या रूपाने काटवणला एकदा मान मिळाला आहे. आरम खोºयाला १९८४ मध्ये बसवाहक रुं जा पुंजा गांगुर्डे, त्यानंतर २००४ मध्ये अजमीर सौंदाणे येथील संजय चव्हाण, तर २०१४ मध्ये दीपिका चव्हाण यांच्या रूपाने मान मिळाला.
ोल्या निवडणुकीत तब्बल साडेबावीस हजार मतांचे विभाजन झाले. त्यामुळे या निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी युतीने सुरुवातीपासूनच व्यूहरचना केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राकेश घोडे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांचा राष्टÑवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: The math of victory over the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.