अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे शासनाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:18 IST2023-03-07T16:18:21+5:302023-03-07T16:18:33+5:30

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे.

Government's directive to immediately conduct Panchnama of farmers' fields affected by unseasonal rains | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे शासनाचे निर्देश

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे शासनाचे निर्देश

नंदुरबार् - जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले, असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. 

नंदुरबार तालुक्यातील कढरे, आसाने , वैंदाणे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री डॉ. गावित यांनी केली, त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वस्त केले.

रमाकांत पाटील

जिल्ह्यातील कढेरे, आसाने, वैंदाने सह जिल्ह्यातल्या  महत्त्वाच्या क्षेत्रात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने जिल्हयात बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी  प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

यावेळी नंदूरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,नंदुरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील ,कृषी सहाय्यक सर्वश्री सतीश गिरासे कंडरे ,बादल बंजारा, गजानन पाटील, सुवर्ण अहिरे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Government's directive to immediately conduct Panchnama of farmers' fields affected by unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.