बालघाट जिल्ह्यात पोलिस नक्षल चकमक, ४ नलक्षवादी ठार
By अंकुश गुंडावार | Updated: June 14, 2025 20:16 IST2025-06-14T20:15:29+5:302025-06-14T20:16:07+5:30
मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश : चामा दादर जंगल परिसरातील घटना

Police-Naxal encounter in Balghat district, 4 Naxalites killed
गोंदिया : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर तालुक्यातील चामा दादर जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती बालघाट येथील नक्षलविरोधी हॅक फोर्सला मिळाली. याच माहितीच्या आधारावर शनिवारी (दि.१४) हॅक फोर्सने या जंगल परिसरात सर्च मोहीम राबविली. या दरम्यान हॅक फोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ नलक्षवादी ठार झाले असून यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या घटनेला बालघाटचे पोलिस अधीक्षक यांनी दुजोरा दिला आहे.
बालाघाट येथील नक्षलविरोधी हॅकफोर्सला चामा दादर जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बालाघाट पोलिस व हॅक फोर्सने या जंगलात शनिवारी पहाटेपासून सर्च मोहीम राबविली. ही सर्च मोहीम राबवित असताना दुपारच्या सुमारास जंगलात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी सुध्दा याचे प्रत्युत्तर देत गोळीबार केला. पोलिस आणि नलक्षवादी यांच्यात पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या चकमकीत ३ महिला व १ पुरुष नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत काही नलक्षवादी सुध्दा जखमी झाले असल्याची माहिती आहे. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविली जात आहे.
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे व्टिट
मध्यप्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बालघाट जिल्ह्यात पोलिस आणि नलक्षवादी यांच्यात रविवारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असल्याच्या घटनेला व्टिट करुन दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात मध्यप्रदेशाला २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने नक्षलविरोधी मोहीम सुरु असल्याचे म्हटले आहे.
घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त
बालाघाट जिल्ह्यातील चामा दादर जंगलात शनिवारी (दि.१४) पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार नलक्षवादी ठार झाले. तर घटनास्थळावरुन रॉकेट लॉचंर, शस्त्र व स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मध्यप्रदेश सरकारकडून सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे.