टीव्ही कलाक्षेत्रात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. श्रेनु पारिख, मानसी श्रीवास्तव नंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्न तयारीला सुरुवात झाली आहे. 'इश्कबाज' फेम अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) जयपूर येथे ग्रँड विवाहसोहळा होणार आहे. सुरभीचं जयपूरच्या एका आलिशान महालात स्वागतही झालं आहे. या महालाची खास बात म्हणजे 'भूलभूलैय्या' चं शूट इथेच झालं आहे. सुरभीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सुरभी बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्नबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा थाटात पार पडला. उद्या 2 मार्च रोजी ते सातफेरे घेणार आहेत. जयपूरच्या आलिशान चोमू पॅलेस हॉटेलमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहे. या महालात होणाऱ्या नवरीचं स्वागत करण्यात आलं. सुरभी आपल्या कुटुंबासोबत 29 फेब्रुवारी रोजी जयपूरमध्ये पोहोचली. तेव्हा 'मंजूलिका' असं कोणीतरी म्हणालं आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं. हा तोच पॅलेस आहे जिथे 'भूलभूलैय्या' चं चित्रीकरण झालं. विद्या बालनने सिनेमात 'मंजूलिका'हे भूताचं पात्र साकारलं होतं. याच पॅलेसमध्ये तिसऱ्या मजल्यावर ती डान्स करायची असा सिनेमात सिक्वेन्स होता.
सुरभी लग्नासाठी खूपच उत्साहित आहे. तसंच तिचे इश्कबाज मधील सहकलाकारही आतुर आहेत. त्यांनी इन्स्टाग्रावर स्टोरी ठेवत सुरभीच्या लग्नात धमाल करणार असल्याचं लिहिलं आहे. सुरभीच्या मेहंदी फंक्शनला सुरुवात झाली आहे. तर उद्या ती आयुष्यभराची गाठ बांधणार आहे.
सुरभी चंदनाने 'संजीवनी', 'नागिन','कबुल है','इश्कबाज' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. ती नुकतीच 'रक्षक:इंडियाज ब्रेव्ज' या वेबसीरिजमध्ये दिसली.