Zaheer Khan on Mumbai Indians, IPL 2022: Rohit Sharma चा मुंबई इंडियन्स संघ सारखा का पराभूत होतेय? जहीर खानने सांगितलं कारण

मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात सुरूवातीचे चारही सामने गमावले.

IPL ची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेली मुंबई इंडियन्स या हंगामात प्रचंड संघर्ष करत आहे. त्यांना सलग चार पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. याचदरम्यान संघाचे क्रिकेट संचालक जहीर खान याने एक महत्त्वाचं मत नोंदवलं आहे.

IPL 2022 मध्ये 9 एप्रिल रोजी मुंबईचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून सात विकेट्सनी पराभव झाला. यापूर्वी त्याला दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभूत केले होते.

सततच्या पराभवामुळे खेळाडूंचे मनोबल खचू शकते याची जाणीव जहीर खान असल्याने जहीरने महत्त्वाचे आणि दिलासादायक विधान केले. त्याचसोबत त्याने मुंबईच्या संघाचा सतत पराभव होण्यामागचं कारणही सांगितलं.

मोक्याच्या क्षणी संघातील खेळाडूंनी सतर्क न राहिल्यामुळे मुंबईचे निसटते पराभव होत आहेत, असं जहीर म्हणाला. पण मुंबई केवळ एका विजयापासून दूर आहे. एकदा मुंबईने एक विजय मिळवला की मुंबईची गाडी रूळावर येईल, असेही जहीर खानने सांगितलं.

जहीरने पत्रकार परिषदेत सांगितले की, "अजून ११ लीग सामने खेळायचे आहेत. आम्हाला दमदार कमबॅक करावाच लागेल. या स्पर्धेत संघ सतत जिंकत किंवा हरत असल्याचे तुम्ही पाहिले आहे. पण आम्हाला केवळ एका विजयाची आवश्यकता आहे."

काही वेळा तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःवर संशय घेऊ शकता. तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो. पण तसं न करता स्वत:वर विश्वास ठेवा आणि दमदार कामगिरी करा असा सल्ला मुंबईच्या संघाला त्याने दिला.

जे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, त्यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवं. नेण्याची गरज असल्याने हा विजय खूप महत्त्वाचा असेल, असेही तो म्हणाला. झहीर म्हणतो, आम्हाला सातत्याने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, परंतु प्रत्येक दिवस तुमचा दिवस असू शकत नाही