विराट कोहलीने ३५ टी-२० विश्वचषक सामने खेळताना तब्बल ८ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याने ३३ डावांत १२९२ धावा केल्या. २०२४ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. झम्पाने २५ सामन्यांत ५ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. ओमानविरुद्ध ३.२ षटकांत १३ धावा देत ४ बळी घेत त्याने हा मान पटकावला.
श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने त्याच्या टी-२० कारकिर्दीत पाच वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे, त्याने या फॉरमॅटमध्ये ३१ सामने खेळले आहेत. महेला यांनी ३१ डावांमध्ये १०१६ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ३३ टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये पाच वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्वात शक्तिशाली आणि स्फोटक फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने ३१ डावांमध्ये ९६५ धावा केल्या आहेत. गेलने या स्पर्धेत १० विकेट्सही घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यानेही २४ सामन्यांत ५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने २२ डावांत ५३७ धावा आणि २२ विकेट्स घेत टी-२० विश्वचषकात अष्टपैलू कामगिरीची छाप पाडली आहे.