Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने मोडले तब्बल ४ विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:29 IST

Open in App
1 / 6

भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तुफानी आघाडी घेतली.

2 / 6

सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने तुफान फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकार होते.

3 / 6

वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यासोबतच १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात वैभवने सर्वात जलद शतक ठोकले. तर संपूर्ण स्पर्धेत त्याचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

4 / 6

वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने भारताच्या उन्मुक्त चंदचा १११ धावांचा विक्रम मोडला आणि विश्वविक्रम रचला.

5 / 6

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला. त्याने १५ षटकार मारत मायकल हिलचा (१२) विक्रम मोडला.

6 / 6

वैभव सूर्यवंशी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने स्पर्धेत ३० षटकार ठोकले. यादीत आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिस (१८) दुसरा तर फिन अँलन (१८) तिसरा आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलवैभव सूर्यवंशीभारत विरुद्ध इंग्लंड