आशिया कपचा १७ वा हंगाम सध्या युएईमध्ये सुरू असून, या स्पर्धेत भारताने एक मोठा विक्रम केला आहे. स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमात भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.