Team India: भारताच्या 'या' 5 क्रिकेटपटूंनी गुपचूप घेतली निवृत्ती, योग्य सन्मानही मिळाला नाही...

Team India: प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते की, त्याची निवृत्ती अतिशय सन्मानाने व्हावी. परंतु भारतात असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला नाही.

Team India: प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते की, त्याची निवृत्ती अतिशय सन्मानाने व्हावी. परंतु भारतात असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला नाही. यात भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. चला तर एक नजर टाकूया भारताच्या 5 दिग्गज क्रिकेटवटूंवर, ज्यांची निवृत्ती अतिशय वाईट पद्धतीने झाली.

महेंद्रसिंग धोनी- महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवू दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC T20 (2007) विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक (2011) आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) जिंकून दिली आहे. याशिवाय 2009 मध्ये भारत प्रथमच कसोटीत नंबर वन बनला होता. डिसेंबर 2014 मध्ये धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमधूनही निवृत्ती घेतली. भारताला इतकं यश मिळवून दिल्यानंतरही धोनीला निरोपाचा सामना मिळू शकला नाही.

वीरेंद्र सेहवाग- वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 104 कसोटीत 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत, ज्यात 23 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 319 आहे. वीरूने 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8273 धावा केल्या, ज्यात 15 शतके आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये वीरूचा सर्वोत्तम स्कोर 219 आहे. याशिवाय वीरूने 19 टी-20 सामन्यांमध्ये 394 धावा केल्या, ज्यामध्ये 68 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. वीरेंद्र सेहवागने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, मात्र त्याला फेअरवेल मॅचचा मान मिळाला नाही.

गौतम गंभीर- गौतम गंभीरने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण त्याला निरोपाच्या सामन्याचा मान मिळाला नाही. गौतम गंभीर 2007 च्या T20 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्याचा आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा श्रीलंकेविरुद्धचा खरा हिरो होता. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि नऊ शतकांसह 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये 97 धावांची संस्मरणीय खेळी आहे. त्याने वनडेमध्ये 11 शतके काढली आहेत. गंभीरने आंतरराष्ट्रीय T20 मध्येही आपली छाप पाडली. त्याने 37 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीने 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या.

राहुल द्रविड- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खराब कामगिरी केल्यानंतर राहुल द्रविडने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. टीम इंडियाचे असे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, द्रविडने कसोटीत 13,288 धावा केल्या आहेत. यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडने वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या 12 शतकांचा समावेश आहे. क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे. त्याने 301 डावात 210 झेल घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या द्रविडने कोचिंगमध्येही मोठे नाव कमवले, पण त्याला निरोपाच्या सामन्याचा मान मिळाला नाही.

झहीर खान- टीम इंडियाचा महान वेगवान गोलंदाज झहीर खानने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र त्याला निरोपाच्या सामन्याचा मान मिळाला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने दीर्घकाळ भारतीय वेगवान गोलंदाजीची सूत्रे हाती घेतली. झहीर बराच वेळ दुखापतग्रस्त होता, ज्यामुळे त्याला टीम इंडियाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. झहीरने फेब्रुवारी 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, तर शेवटचा वनडे ऑगस्ट 2012 मध्ये पल्लीकलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. झहीर खानने भारतासाठी 92 कसोटी सामन्यांमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत, तर 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये 282 बळी घेतले आहेत. याशिवाय 17 टी-20 सामन्यात 17 बळी घेतले आहेत. झहीरने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 हून अधिक बळी घेतले आहेत.