Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20I: अभिषेक शर्मा नव्हे तर, रोहित- विराट सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट; किती वेळा झाले बाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:02 IST

Open in App
1 / 5

रोहित शर्मा: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या नकोशा विक्रमात पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने १५९ टी-२० सामन्यांतील १५१ डावांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या आहेत. मात्र, तब्बल १२ वेळा तो एकही धाव न काढता बाद होऊन माघारी परतला आहे.

2 / 5

विराट कोहली: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने १२५ सामन्यांतील ११७ डावांमध्ये ४१८८ धावा केल्या आहेत. धावांचा डोंगर उभा करणाऱ्या विराटच्या नावावर ७ वेळा शून्यावर बाद होण्याची नोंद आहे.

3 / 5

संजू सॅमसन: २०२६ च्या विश्वचषक संघाचा भाग असलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. संजूने आतापर्यंत ५० डावांमध्ये फलंदाजी करताना ११०० धावा केल्या आहेत, पण तो सुद्धा विराटप्रमाणेच ७ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

4 / 5

अभिषेक शर्मा: युवा तुफान अभिषेक शर्माने अत्यंत कमी कालावधीत या यादीत चौथे स्थान गाठले आहे. त्याने आतापर्यंत ४० डावांत १२९७ धावा केल्या आहेत. मात्र, चालू विश्वचषकातील खराब फॉर्ममुळे त्याच्या खात्यात आता ६ 'डक' जमा झाले आहेत. सुपर ८ सामन्यांपूर्वी त्याचा हा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब आहे.

5 / 5

सूर्यकुमार यादव: टीम इंडियाचा सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव या यादीत अभिषेक शर्मासह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे. सूर्याने १०२ डावांत ३१९२ धावा केल्या आहेत, पण तो ही ६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.