Join us

पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:58 IST

Open in App
1 / 5

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंद भारतासाठी फक्त एकच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात त्याने १ विकेट घेतली, पण १२ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्यानंतर त्याला पुन्हा कधीही भारतीय संघात संधी मिळाली नाही.

2 / 5

जम्मू आणि काश्मीरचा परवेझ रसूलने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी आपला एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने २०१४ मध्ये एक एकदिवसीय सामनाही खेळला, पण त्यानंतर तो क्रिकेटच्या जगातून जणू गायबच झाला. आज तो एक अनामिक खेळाडू म्हणून ओळखला जातो.

3 / 5

उत्तर प्रदेशातील सुदीप त्यागीने भारतासाठी केवळ एकच टी-२० सामना खेळला. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २००९ ते २०१० अशी खूपच लहान होती. त्याने या एका टी-२० सामन्याशिवाय चार एकदिवसीय सामनेही खेळले, पण त्याला फारशी ओळख मिळाली नाही.

4 / 5

एस बद्रीनाथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरी, तो फक्त एकच टी-२० सामना खेळू शकला. त्याने २ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामनेही खेळले. मात्र, आयपीएलमध्ये ९५ सामने आणि शेकडो देशांतर्गत सामने खेळल्यामुळे त्याला बरीच ओळख मिळाली.

5 / 5

दिनेश मोंगिया हा भारतासाठी पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, हाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरला. त्याने ५७ एकदिवसीय सामने खेळले असले, तरी आजच्या पिढीला त्याची फारशी माहिती नाही.

टॅग्स :ऑफ द फिल्ड