Join us  

Rohit Sharma vs Virat Kohli, IPL 2022 : रोहित शर्माच्या विधानामुळे RCB चे चाहते नाराज; पाहा काय बोलला Mumbai Indians चा 'हिटमॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 9:36 PM

Open in App
1 / 6

Rohit Sharma vs Virat Kohli : IPL 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबईला मंगळवारी हैदराबादकडून पराभूत व्हावे लागले. आता स्पर्धेतील अवघा एक आठवडा शिल्लक असताना प्ले-ऑफसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.

2 / 6

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) ची परिस्थिती फारच विचित्र झाली. ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले, पण विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे भवितव्य मुंबईच्या सामन्यावर आहे.

3 / 6

असे असतानाच रोहित शर्माने एक वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्यामुळे RCBचे चाहते चांगलेच नाराज झाले. मुंबई इंडियन्सने शेवटचा साखळी सामना हरला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले-ऑफमध्ये पोहोचणे कठीण होणार आहे.

4 / 6

मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध होणार आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा असं काही बोलला की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते संतापले.

5 / 6

'आम्हाला ही स्पर्धा विजयी नोटवर संपवायची आहे. शेवटच्या सामन्यात आम्ही काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. त्याच्या भरवशावर आम्हाला पुढील हंगामाची तयारी सुरू करता येईल', असे रोहित शर्मा म्हणाला.

6 / 6

जर रोहितचा मुंबई संघ दिल्लीविरोधात पराभूत झाला तर बंगलोरसाठी प्ले-ऑफचे तिकीट मिळवणं अधिक सोपं होईल. पण मुंबईने दिल्लीला पराभूत केले तर १४ गुणांसह दोन-तीन संघ एका स्थानासाठी झगडताना दिसू शकतील. त्यामुळे RCBचे चाहते काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्माविराट कोहलीमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App