IPL 2023: पावसामुळे Qualifier 2 रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये खेळणार?

नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर...

Mumbai Indians vs Gujarat Titans : IPLचा दुसरा क्वालिफायर (IPL 2023 Qualifier 2) सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबईच्या संघाने बुधवारी लखनौ संघाचा पहिल्या एलिमिनेटरमध्ये पराभव केल्याने त्यांना पुढच्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी, २६ मे रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स संघात हा सामना होणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.

पण पावसामुळे हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत CSK विरुद्ध कोणता संघ खेळेल, हा एक पेचच आहे. पण त्यासाठी स्पर्धेचे काही नियम ठरवून दिले आहेत. त्यामुळे अशा वेळी कोणत्या संघाला फायदा मिळेल हे जाणून घेऊया.

IPL मधील साखळी फेरीत एखादा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो. पण प्लेऑफ सामन्यांसाठी आयपीएलचा नियम खूपच वेगळा आहे. अशा स्थितीत पावसामुळे क्वालिफायर रद्द झाल्यास कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, असा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.

IPL च्या नियमांनुसार, पात्रता फेरी रद्द झाल्यास, गुजरात टायटन्स संघाला फायनलमध्ये CSKच्या संघाविरूद्ध खेळायची संधी मिळणार आहे. तर पावसाचा फटका बसल्याने मुंबई इंडियन्सला संधी न मिळताच स्पर्धेतून बाद व्हावे लागेल. याचा नियम काय जाणून घ्या.

नियमानुसार, पावसाने सामना रद्द झाल्यास लीग टेबलमध्ये अधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत खेळतो. IPLच्या साखळी फेरीत 10 सामने जिंकल्यानंतर गुजरात संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मुंबईला 14 सामन्यांत 8 सामने जिंकत 16 गुणच मिळवले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत क्वालिफायर-2 पावसामुळे रद्द झाल्यास गुजरात टायटन्स संघ अंतिम फेरीत खेळेल.