दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना दुस-या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव करुन ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली

कोहलीने अजिंक्य रहाणेसह (५५) दुसºया गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज छाप पाडण्यात अपयशी ठरले. केदार जाधव (२४), हार्दिक पांड्या (२०) व भुवनेश्वर (२०) यांनी थोडाफार प्रतिकार केला

विराट कोहली ३१ व्या एकदिवसीय शतकापासून केवळ आठ धावांनी वंचित राहिला. त्याने १०७ चेंडूत आठ चौकारांसह ९२ धावा ठोकल्या. भारताचा डाव ५० षटकांत सर्वबाद २५२ असा मर्यादित राहिला.

हिल्टन कार्टराइट (१) व डेव्हिड वॉर्नर (१) स्वस्तात परतल्याने कांगारुंची २ बाद ९ धावा अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (५९) व ट्राविस हेड (३९) यांनी डावा सावरला

कुलदीपने ३३व्या षटकात वेड, एगर व कमिन्स यांना बाद करत निर्णायक हॅट्ट्रीक घेऊन कांगारुंची ८ बाद १४८ अशी अवस्था केली. हॅट्ट्रीक घेत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय म्हणून कुलदीपने छाप पाडली. विशेष म्हणजे गेल्या २७ वर्षांत एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय ठरला.

एका बाजूने टिकून राहिलेल्या मार्कस स्टोइनिसने ६५ चेंडूत नाबाद ६२ धावा करत संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, पांड्याने कुल्टर-नाइल आणि भुवीने रिचर्डसनला बाद करुन भारताचा विजय निश्चित केला.

५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे