आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. हा सामना केवळ विजेतेपदासाठी नसून, गेल्या काही वर्षांतील फायनलमधील अपयशाचा बदला घेण्यासाठी भारतासाठी एक मोठी संधी आहे. आकडेवारीनुसार, फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्यामुळे, आजचा सामना भारतासाठी जुने हिशेब चुक्ता करणारा ठरू शकतो.