Join us  

ICC T20 World Cup 2021 : टी-२० विश्वचषकातून भारताने गाशा गुंडाळल्यानंतर विराट कोहलीने लिहिला इमोशनल मेसेज, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 4:26 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघाचे टी-२० विश्वचषकातील अभियान नामिबियाविरुद्धच्या विजयाबरोबरच संपुष्टात आले. भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही.

2 / 7

सुरुवातीच्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवांमुळे भारतीय संघ अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध मोठे विजय मिळवूनही उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

3 / 7

स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला टिकेचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, नामिबियाविरुद्ध झालेला सामान हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला.

4 / 7

एक कर्णधार म्हणूनही विराट कोहली आपल्या शेवटच्या स्पर्धेला अविस्मरणीय बनवू शकला नाही. स्पर्धेतून बाहेर पडताच विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश लिहिला आहे.

5 / 7

यात तो म्हणतो की, आम्ही एकत्र आपले लक्ष्य गाठण्यासाठी निघालो होतो. मात्र दुर्दैवाने आम्ही थोडे मागे राहिलो. आमच्यापेक्षा अधिक निराश कुणी नाही आहे.

6 / 7

तुम्हा सर्वांचा पाठिंबा चांगला राहिला आहे. तसेच आम्ही त्यासाठी आभारी आहोत. अधिक भक्कमपणे पुनरागमन करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

7 / 7

शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नामिबियावर ९ विकेट्सनी मात केली होती. मात्र हा सामना केवळ औपचारिकताच होता.

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020भारतीय क्रिकेट संघ
Open in App