Join us  

टीम इंडियाकडून कसा निसटला विश्वचषक, पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 10:14 PM

Open in App
1 / 9

ध्रुव जुरेल आणि अथर्व अंकोलेकर यांनी धाव घेताना एकाच दिशेने रनप केला अन् जुरेल बाद झाल्याने टीम इंडियाला फटका बसला

2 / 9

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020, युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशने भारतावर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या.

3 / 9

बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले.

4 / 9

या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. भारताने या सामन्यात तब्बल २९ अवांतर धावा बांगलादेशला आंदण दिल्या.

5 / 9

भारताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती.

6 / 9

न्यूझीलंड येथे सिनियर टीम इंडियानेही अंडर 19 विश्वचषक 2020 स्पर्धेचा सामना एकत्रितपणे पाहिला, पण भारताला निराशा पत्करावी लागली.

7 / 9

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात काही काळ पावसाचा खेळ पाहायला मिळाला, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार अंतिम टप्प्यात खेळविण्यात आलं.

8 / 9

भारताची वाटचाल पराभवाच्या दिशेने असताना यशस्वी जैसस्वालने देवाचा धावा करत वरुणराजाला साकडे घातले तो क्षण, यशस्वीने महत्वपूर्ण खेळी करत 88 धावा करत 1 गडीही बाद केला होता.

9 / 9

टीम इंडियाच्या पराभवाचं दु:ख वाटणार नाही तो भारतीय कसला, सामन्याच्या शेवटच्या क्षणी डोळ्यात अश्रू तरळलेला भारतीय

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप