याआधी २००७ मध्ये मीरपूर कसोटी सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून एका कसोटी सामन्यात ४ शतके पाहायला मिळाली होती. दिनेश कार्तिक १२९ (२१२), वासीम जाफर १३८ (२२९), कर्णधार राहुल द्रविड १२९ (१७६) आणि सचिन तेंडुलकरनं १२२ (२३६)* यांनी पहिल्या डावातच शतके झळकावली होती.