...अन् ५ शतकांच्या जोरावर टीम इंडियानं रचला इतिहास; असं पहिल्यांदाच घडलं!

याआधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एका सामन्यात टीम इंडियाकडून आली होती चार शतके

विराट कोहली अन् रोहित शर्मा या दिग्गजांच्या अनुपस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नव्या पर्वाची सुरुवात एकदम धमाक्यात सुरुवात केलीये. इंग्लंड दौऱ्यावरील लीड्स येथील हेडिंग्ले कसोटी सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला आहे.

पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल याने १५९ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली.

कॅप्टन्सीतील पदार्पणाच्या सामन्यात शुबमन गिलनं २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४७ धावांची खेळी केली.

पहिल्या डावात उप कर्णधार रिषभ पंतची बॅटही तळपली. त्याने पहिल्या डावात १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १३४ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात लोकेश राहुलनं संयमी खेळी करत आपल्या भात्यातील क्लास खेळीचा नजराणा पेश केला. त्याने २४७ चेंडूत १८ चौकाराच्या मदतीने १३७ धावांची दमदार खेळी केली.

रिषभ पंतनं दुसऱ्या डावातील शतकासह ११८ (१४०) इंग्लंडमध्ये एका सामन्यात दोन शतके झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. या शतकासह टीम इंडियाच्या नावेही खास रेकॉर्डची नोंद झाली.

कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच तेही इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाकडून एका कसोटी सामन्यात पाच शतके पाहायला मिळाली आहेत.

याआधी २००७ मध्ये मीरपूर कसोटी सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून एका कसोटी सामन्यात ४ शतके पाहायला मिळाली होती. दिनेश कार्तिक १२९ (२१२), वासीम जाफर १३८ (२२९), कर्णधार राहुल द्रविड १२९ (१७६) आणि सचिन तेंडुलकरनं १२२ (२३६)* यांनी पहिल्या डावातच शतके झळकावली होती.